नात तुटत
तेंव्हा नक्कि काय होत?!
काळजात कुठेतरी खुपत
वरुन कितीही दाखवल ना
तरी मन कुठेतरी रडत
अचानक आकाश भरुन यावएखादेवेळी अन् पाऊस पडूच नये
आणि मधूनच वीज चमकत राहावी
तशीच आठवन येऊन जाते
वेळ कातर होत राहते
जखम जुनीच असते
नुकतीच कुठे खपली धरु लागलेली
पुन्हा नव्याने भळभळू लागते
चुक कोणाची असते
किंवा असते की नसते
ह्याला आता फ़ारसा अर्थ नसतो
अन् हे सगळ आठवून
हताशपणे बघण्यापलिकडे
काहिच उरलेल नसत....
हे अस का व्ह्याव!!!.. ♥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा